Image
प्रज्ञेचा शोध की पदव्यांचा बाजार? – एका नव्या शैक्षणिक क्रांतीची गरज प्रत्येक मनुष्य एका विशिष्ट जन्मजात ओढीसह (Natural Inclination) जन्माला येतो. बौद्धिक प्रगल्भता ही केवळ प्रयत्नसाध्य नसून ती उपजत असते. जर केवळ प्रयत्नांनी कोणीही काहीही बनू शकला असता, तर आज गल्लीतले सर्व विद्यार्थी ‘अल्बर्ट आईन्स्टाईन’ झाले असते. पण वास्तव वेगळे आहे. "आजची शिक्षण पद्धती माणसाची नैसर्गिक प्रज्ञा ओळखण्याऐवजी तिला एका ठराविक साच्यात कोंबण्याचा प्रयत्न करत आहे." १. आजच्या शिक्षण पद्धतीची शोकांतिका शाळा आणि महाविद्यालये केवळ ‘माहितीचे साठे’ तयार करत आहेत. सृजनशीलतेचा विकास करण्याऐवजी मेंदूवर नाहक ताण दिला जात आहे. आजचे शिक्षण ‘सेवा’ देणारे तज्ज्ञ घडवण्याऐवजी, ‘पैसा’ कमावणारे रोबोट तयार करत आहे. पदवी मिळवण्यामागे सेवा हा भाव नसून पैसाच प्रेरणा ठरत आहे. २. कौशल्यपूर्ण आणि थेट शिक्षण: काळाची गरज आपल्याला अशा शिक्षण व्यवस्थेची गरज आहे जिथे शिक्षण केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष अनुभवाधार...

जुनी घरे विरुद्ध आधुनिक बांधकाम – पर्यावरण आणि आरोग्याचा विचार

जुनी घरे विरुद्ध आधुनिक बांधकाम

जुनी घरे विरुद्ध आधुनिक बांधकाम – पर्यावरण आणि आरोग्याचा विचार

जुन्या काळात घरे साधी असली तरी पर्यावरणपूरक होती. मातीच्या भिंती, ऊसाच्या पाचटाचे छप्पर. त्याला आधारासाठी किरळांच्या झावळ्या, लिंबा-बाभळीच्या मेडी, भिंतींना पांढऱ्या मातीचा गिलावा, जमीन गायीच्या शेणाने सारवलेली. हे सर्व साधं असलं तरी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होतं. त्यामध्ये निसर्गाचा कुठेही ऱ्हास होत नव्हता.

मात्र आज सगळीकडे टोलेजंग इमारती दिसत असल्या तरी त्या पर्यावरणपूरक नाहीत. बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाला. परिणामी पाणी नैसर्गिकरित्या गाळले जात नाही. ते पाणी पिण्यायोग्य आणि शेतीच्या पिकायोग्य देखील राहिलेले नाही. दगडांसाठी प्रचंड खोदकाम केले गेले. अनेक ठिकाणी पर्वत, डोंगर, टेकड्या अस्ताव्यस्त केले गेले. ही प्रगती नसून आत्मघात आहे.

पैशाच्या हव्यासाने लोकांनी बागायती जमिनी विकल्या. प्रगतीच्या नावाखाली तेथे सिमेंटची जंगले उभी राहिलीत. तथाकथित प्रगतीच्या मृगजळा मागे धावून मनुष्य स्वतःचा विध्वंस करून घेत आहे. जंगले नाहीशी झाल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरकाव करू लागली आहेत. अर्थातच त्यांचा माणसाला उपद्रव होऊ लागलेला आहे. पण तो दोष त्या वन्य प्राण्यांचा नसून माणसाचा आहे.

शिवाय जुन्या पद्धतीची घरे आर्थिक दृष्ट्या परवडणारी आणि सहजासहजी बांधता येणारी होती. आज बंगला बांधण्याच्या नादात बऱ्याच लोकांचे पूर्ण जीवनच त्याचे हप्ते फेडण्यात जाते. प्रत्येक पिढीला स्वतःचे घर बांधण्यासाठी संधी मिळायलाच हवी. त्यासाठी आधीच्या पिढ्यांनी एवढी उठा ठेव करण्याची गरज नाही. काही ठराविक क्षेत्रात सिमेंट-काँक्रीटची भक्कम बांधकामे आवश्यक आहेतच. पण याचा अर्थ सर्वांनीच भक्कम बंगले बांधून राहायला पाहिजे असाही होत नाही. बंगल्या मधील फरश्यांमुळे देखील काही आजार निर्माण होतात.

खरे प्रगतीचे मोजमाप म्हणजे निसर्गाशी सुसंगत आणि सर्वांना परवडणारी घरे उभी करणे होय.

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

MSP क्यों आवश्यक है?