विषारी अन्न, वाढता कॅन्सर आणि रासायनिक शेती : ही केवळ चूक नाही, तर अपराध आहे
विषारी अन्न, वाढता कॅन्सर आणि रासायनिक शेती : ही केवळ चूक नाही, तर अपराध आहे विषारी अन्न, वाढता कॅन्सर आणि रासायनिक शेती : ही केवळ चूक नाही, तर अपराध आहे हल्ली कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. ही वाढ फक्त योगायोग नाही, ना केवळ जीवनशैलीचा परिणाम आहे. हा दीर्घकाळ शरीरात साठत गेलेल्या विषाचा परिणाम आहे, आणि त्या विषाचा सर्वात मोठा स्रोत आज अन्न बनले आहे. अज्ञान नव्हे, जाणीवपूर्वक केलेला स्वार्थ आज शेतीमध्ये युरिया, रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशके अज्ञानातून वापरली जात नाहीत. प्रमाण किती असावे, फवारणीचा कालावधी काय असावा, काढणीपूर्वी किती दिवस थांबावे — हे सर्व माहिती असूनही पैशाच्या हव्यासापोटी अतिरेकी वापर केला जातो. समाज, देश, देशबांधव, मानवता — अन्न पिकवताना या मूल्यांशी कोणालाही देणेघेणे उरलेले नाही, हे वास्तव स्वीकारावे लागेल. चायना भाजीपाला : प्रणालीचे भयावह उदाहरण हल्ली बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळणारा तथाकथित “चायना भाजीपाला” हा या संपूर्ण समस्येचे टोकाचे उदाहरण आहे. अतिजलद वाढ, अस्वाभाविक आकार, ...