रस्ता खुला झाला… पण न्याय अजूनही बंदच!
रस्ता खुला झाला… पण न्याय अजूनही बंदच! वहिवाटी शेतरस्त्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे वास्तव ग्रामीण भागातील हजारो शेतकरी आजही त्यांच्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. ज्या देशात शेतकऱ्याला “अन्नदाता” म्हटले जाते, त्याच शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठी प्रशासनाच्या दारात विनवण्या कराव्या लागतात, निवेदने द्यावी लागतात आणि अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागतो, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. अनेक वेळा प्रशासनाकडून “रस्ता खुला” केल्याची कारवाई दाखवली जाते. परंतु प्रत्यक्षात पाहिले असता अनेक गंभीर त्रुटी दिसून येतात. भूमी अभिलेख विभागाकडून अधिकृत मोजणी केली जात नाही. रस्त्याची कायदेशीर रुंदी निश्चित केली जात नाही. सीमारेषा आणि कायमस्वरूपी हद्दखूण निश्चित केल्या जात नाहीत. पंचनाम्यात महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख टाळला जातो. फक्त वरवरची कारवाई करून प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारची अपूर्ण कार्यवाही भविष्यात पुन्हा वाद निर्माण करते. आज रस्ता खुला केला, पण उद्या पुन्हा अतिक्रमण झाले तर जबाबदार कोण? पंचनामा की औपचारिकता? अनेक...