शिवशाहीचा न्याय आणि आजची व्यवस्था
शिवशाहीचा न्याय आणि आजची व्यवस्था जो नराधमांना रडवतो धायधाय — त्याचं नाव न्याय! जो नराधमांना जोडायला लावतो हात आणि धरायला लावतो पाय — त्याचं नाव न्याय! असा होता आपल्या राजांचा न्याय. म्हणूनच आजही नाही त्यांच्या आदर्श शिवशाहीला पर्याय! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या न्यायाचा अर्थ होता — एकाला शासन आणि बाकीच्यांना धडा. ⚖ राजांच्या न्यायव्यवस्थेची पाच वैशिष्ट्ये विनामूल्य न्याय – न्यायासाठी पैशाचा अडसर नव्हता. तत्काळ न्याय – विलंब नव्हे, त्वरित निर्णय. शाब्दिक युक्तीवादाला थारा नव्हता – सत्याला सर्वोच्च स्थान. न्यायाची दहशत – गुन्हेगार भयभीत. कुटुंबाची जबाबदारी –गुन्हेगाराच्या निरपराध कुटुंबाचे पालनपोषण व संरक्षण. ज्या न्यायव्यवस्थेत साक्षीदार फुटतात आणि पुराव्याअभावी गुन्हेगार सुटतात — ती न्यायव्यवस्था असून नसल्यासारखीच. 💰 राजांचा आर्थिक न्याय राजांनी रयतेला फक्त सबसिडी दिली नाही; देशप्रेमाचे संस्कार दिले. फक्त काम दिले नाही; कामाला योग्य दाम दिले. आज गरिबीचे खरे कारण कामांची कमतरता नाही, ...