Posts

Showing posts with the label गरीबी निर्मुलन

गरीबी, श्रीमंती व कर्तृत्व

गरीबी, श्रीमंती व कर्तृत्व सच्च्या देशसेवेला न्याय देणारी आदर्श अर्थ वितरण प्रणाली हाच गरिबी हटवण्याचा एकमेव उपाय आहे. देशातील गरिबी व श्रीमंती माणसाच्या कर्तृत्वाशी संबंधित नसून सदोष अर्थ वितरण प्रणालीशी संबंधित आहे हे स्पष्ट आहे. मुळात पैसा ही निसर्गनिर्मित वस्तू नसून मानवनिर्मित वस्तू आहे. पैसा हे फक्त विनियोगाचे साधन आहे. माणसा-माणसांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण सुलभ करण्याचे ते फक्त एक साधन आहे ही गोष्ट कधीही विसरता कामा नये. पैसा हे जीवन जगण्याचे माध्यम आहे, साधन नाही. पैशांच्या स्वरूपातील आर्थिक व्यवहार हेच भ्रष्टाचाराचे मूळ असून भ्रष्टाचारामुळेच गरिबी व श्रीमंतीचा उदय झाला आहे. आज देशात खरे देशसेवक उपाशी आणि देशद्रोही तुपाशी अशी जी माणुसकीला काळीमा फासणारी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला कारण हा पैसाच आहे. माणसाचे कर्तृत्व पैशात मोजले जावे याच्यासारखी नीच गोष्ट दुसरी कोणतीही नाही. मुळात पैसा हा कर्तृत्वात मोजला जायला हवा; पण तसे होत नाही. ज्यांचे काम खरी देशसेवा आहे, ज्यांच्या कामाचा देशाला उपयोग होतो, ज्यांच्या कामामुळे देशाची प्रगती होते, ज्यांच्या कामात खऱ्या अर्थाने श...

श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज

श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज भारताच्या प्रगतीचा खरा पाया म्हणजे इथले श्रमिक, शेतकरी, मजूर आणि गरीब जनता. आजही देशाच्या विकासासाठी अखंड मेहनत करणाऱ्या या श्रमिकांच्या हातांना पुरेसा मोबदला, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळालेला नाही. या असमानतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी “श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज” ही चळवळ उभी राहिली आहे. आमचे उद्दिष्ट प्रत्येक श्रमिकाला योग्य काम आणि योग्य मोबदला मिळावा. गरीब आणि वंचितांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देणे. श्रमिक हक्कांविषयी जनजागृती करणे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यामध्ये समान संधी निर्माण करणे. श्रमिकांना संघटित करून त्यांच्या समस्यांचे सामूहिक निराकरण करणे. का आवश्यक आहे ही क्रांती? आज गरीब आणि श्रमिक वर्गाला केवळ जिवंत राहण्यासाठीच संघर्ष करावा लागतो. महागाई, कमी वेतन, असुरक्षित रोजगार, आरोग्य व शिक्षणाचा अभाव या समस्या त्यांचे जीवन कठीण करतात. “श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज” या चळवळीचे ध्येय म्हणजे या आवाजांना एकत्र आणून, त्यांना हक्क मिळवून देणे आणि समानतेवर आधारित समाज उभारणे. आपण कसे सहभागी होऊ शकत...

प्रत्येकाच्या कामाला योग्य दाम द्या, आणि प्रत्येकाकडून कर वसूल करा

   प्रत्येकाच्या कामाला योग्य दाम द्या, आणि प्रत्येकाकडून कर वसूल करा महत्वाची सूचना: हा लेख प्रामाणिक राष्ट्रसेवकांसाठी नाही. त्यांनी मनाला लावून घेऊ नये. देश चालतो तो केवळ करदात्यांच्या भरलेल्या पैशांवर नाही, तर शेतकरी, कंत्राटी कामगार आणि इतर कष्टकऱ्यांच्या शोषणातूनही! हे जळजळीत वास्तव आपण विसरून चालणार नाही. "कमी काम, जास्त दाम" – हा प्रकारदेखील एका प्रकारचा फुकटखाऊपणा आहे. कर भरणे म्हणजे देशावर उपकार करणे नव्हे. खरे उपकारकर्ते तर शेतकरी आणि श्रमिक वर्गच आहेत. तेच अन्न उगमवतात, तेच इमारती उभारतात, तेच उत्पादन करतात – त्यांच्या कष्टावरच समाज आणि अर्थव्यवस्था उभी आहे. पण तरीही, त्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला दिला जात नाही. शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो, पण त्याच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाही. कंत्राटी कामगारांना १६-१६ तास गुरांप्रमाणे राबवले जाते, पण वेतन अत्यल्प असते. कुठलाही सामाजिक सुरक्षा कवच दिला जात नाही. या कामगारांच्या कष्टावरच ठेकेदार, दलाल आणि मालक वर्ग श्रीमंत होतो आहे. हे पाहता, करदात्यांनी स्वतःच्या प्रामाणिकतेचा अहंकार करताना ए...