गरीबांच्या ताटावर चर्चा, पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मौन

Image
  गरीबांच्या ताटावर चर्चा, पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मौन आजच्या समाजात एक विचित्र आणि वेदनादायक चित्र दिसते. गरीब माणसाला सरकारकडून काही किलो मोफत धान्य मिळाले, एखादी शिष्यवृत्ती मिळाली किंवा एखादी योजना मिळाली की लगेच काही लोक त्याला “फुकटखाऊ” म्हणू लागतात. पण दुसऱ्या बाजूला जनतेच्या पैशांवर डल्ला मारणारे, लाखो रुपयांचा पगार घेऊनही लाचखोरी करणारे अधिकारी आणि विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधींचे कमिशन लाटणारे भ्रष्ट पुढारी यांच्याबद्दल मात्र समाजात तितक्याच तीव्रतेने चर्चा होताना दिसत नाही. गरीबांच्या ताटावर चर्चा होते; पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मात्र मौन पाळले जाते. हीच आपल्या व्यवस्थेची आणि सामाजिक मानसिकतेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. गरीब मदत घेतो, कारण परिस्थिती त्याला भाग पाडते एखादा शेतकरी दुष्काळामुळे उद्ध्वस्त होतो. एखादा मजूर रोजंदारी नसल्यामुळे उपाशी झोपतो. एखादी विधवा महिला, वृद्ध व्यक्ती किंवा बेरोजगार युवक शासनाच्या योजनेचा आधार घेतो. हे लोक मदत घेतात कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यांना मोफत धान्य, शिष्यवृत्ती किंवा अनुदान ही चैनीची...

देशातील गरिबी हटविणे सहज शक्य आहे

Shramik Kranti – Garibon Ka Aawaz देशातील गरिबी हटविणे सहज शक्य आहे

देशातील गरिबी हटविणे सहज शक्य आहे

देशातील गरिबीची कारणे ही बेरोजगारी, शालेय शिक्षणाचा अभाव, कर्तृत्वाचा अभाव किंवा देशात पैशांची टंचाई नाहीत. खरे कारण म्हणजे श्रमिकांच्या श्रमाला योग्य दाम न देणारी, अन्यायकारक व सदोष अर्थवितरण प्रणाली. याच मुळावर घाव घातला गेला पाहिजे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रोख पैशांच्या स्वरूपातील सर्व आर्थिक व्यवहार पूर्णतः बंद झाले पाहिजेत. असे झाले तर प्रत्येकाचे उत्पन्न रेकॉर्डवर येईल आणि कुणाकडेही लपवाछपवीची संधी उरणार नाही.

आज देशातील जवळपास 40% संपत्ती केवळ 1% लोकांच्या हातात आहे. अनेकांच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावर बेनामी मालमत्ता आणि भ्रष्टाचारातून जमवलेली संपत्ती आहे. जर सर्व व्यवहार फक्त ऑनलाईन किंवा चेकच्या माध्यमातून झाले, तर प्रत्येकाची आर्थिक हालचाल सरकारला सहज कळू शकेल.

यासाठी ‘श्रमिक हक्क निधी’ या नावाने एक स्वतंत्र कर प्रणाली सुरू करावी. या माध्यमातून जमा झालेला पैसा थेट गोरगरीब श्रमिक व कष्टकऱ्यांच्या श्रमाला योग्य दाम देण्यासाठी वापरला गेला पाहिजे.

याच मार्गाने देशातील गरिबीचे मूळ नष्ट होईल आणि खरी समानता व सामाजिक न्याय प्रस्थापित होईल.

– श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

Poisoned Food, Rising Cancer and Chemical Farming: This Is Not Just a Mistake, It Is a Crime