Posts

Showing posts from September, 2026

🐄 वासराला रस्त्यावर सोडताना आपण काय गमावतोय?

  🐄 वासराला रस्त्यावर सोडताना आपण काय गमावतोय?        शेणखत महाग झाले, रासायनिक खतांचा अतिरेक वाढला; मग गोवंशाच्या संगोपनाचा विचार का करू नये? ज्या गाई-बैलांच्या श्रमातून आणि शेणमूत्रातून शेतीला आधार मिळतो, त्यांच्याच नर वासरांना निरुपयोगी समजून सोडून देणे ही केवळ पशुक्रूरता नाही—ही आपल्या कृषिसंस्कृतीशी केलेली कृतघ्नता आहे.     आज आमच्या परिसरात एक अगदी लहान वासरू सोडून दिलेल्या अवस्थेत आढळले. त्याला आईपासून वेगळे करून असेच सोडले गेले असावे. त्याची अवस्था पाहून आम्ही काहीतरी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही अशाच प्रकारे सोडून दिलेली दोन वासरे आमच्या निदर्शनास आली होती. योग्य वेळी त्यांना आधार मिळाला नाही आणि अखेर उपासमार व भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना पुन्हा घडू नये म्हणून यावेळी आम्ही गोशाळा आणि पशुवैद्यकीय मदतीसाठी अनेक ठिकाणी संपर्क केला. बहुतांश ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही; मात्र भटवाडी, सिन्नर येथील माऊली गोशाळेने सहानुभूती दाखवून मदतीबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले. यातून एक प्रश्...