आरक्षण नको म्हणणाऱ्यांनो आधी जातिव्यवस्था नष्ट करायला तयार आहात का?

Image
आरक्षण नको म्हणणाऱ्यांनो आधी जातिव्यवस्था नष्ट करायला तयार आहात का? आजकाल सोशल मीडियावर आरक्षणविरोधी अनेक संदेश व्हायरल होत आहेत. पण एक मूलभूत प्रश्न कोणी विचारत नाही — जर आरक्षण एवढं चुकीचं असेल, तर जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण तयार आहोत का? आरक्षण ही समस्या नाही, तर ती एका मोठ्या समस्येचा परिणाम आहे — जातिव्यवस्था . शतकानुशतकं काही समाजघटकांना शिक्षण, संधी आणि सन्मानापासून वंचित ठेवण्यात आलं. त्यामुळेच त्यांना समान संधी देण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले होते — “जाति नष्ट केली नाही, तर समानता कधीच येणार नाही.” मग प्रश्न असा आहे — जर आपण खरोखर समानता मानत असू, तर जात अजूनही का जिवंत आहे? लग्न, समाज, राजकारण यात अजूनही जात का ठरते? जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण कितपत प्रयत्न करतो? गरीबी जात पाहून येत नाही — हे खरे आहे. पण भारतात अनेक पिढ्यांपासून जातीनुसार अन्याय झाला आहे, हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच आरक्षण हे केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक न्यायाचं साधन आहे. आरक्...

भारतीय माणसाचे जीवन ध्येय: केवळ संपत्तीची जमवाजमव?

 

भारतीय माणसाचे जीवन ध्येय: केवळ संपत्तीची जमवाजमव?

भारतीय समाजात एक विचित्र पण वास्तववादी प्रवृत्ती वाढत चालली आहे – स्वतःसाठी जास्तीत जास्त संपत्ती जमा करणे हेच जीवनाचे ध्येय मानले जात आहे. या विचारधारेमुळे व्यक्तीच्या जीवनातील सेवा, परोपकार, सहकार्य, निस्वार्थता यांसारख्या मूल्यांचा ऱ्हास होत आहे.

आज कोणतेही काम सेवाभावातून न होता लूटभावातून केले जात आहे. व्यावसायिक, नोकरदार, दुकानदार, बांधकाम व्यावसायिक असो – बहुसंख्य लोक मूल्याधिष्ठित सेवा न देता ग्राहकाच्या/जनतेच्या गरजा हा फायद्याचा स्रोत मानतात.

प्रचलित शिक्षणपद्धतीतून काय शिकतोय समाज?

शाळा-कॉलेजांमधील शिक्षणप्रणालीने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, सेवावृत्ती, नैतिकता इ. मूल्यांचं बाळकडू देणं अपेक्षित होतं. परंतु आज शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवणं, ती नोकरी म्हणजे फक्त पैसा कमावण्याचं साधन, आणि त्यामुळे शिक्षण म्हणजे शेवटी संपत्तीचा मार्ग – अशी साखळी तयार झाली आहे.

यातून समाजसेवा, उदात्त ध्येय, देशसेवा, सत्य, सादगी यांसारख्या गोष्टींना फाटा दिला जातो. विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्येही हाच विचार नकळत रुजत चालला आहे.

या मानसिकतेचे परिणाम

  • सामाजिक विषमता वाढते – श्रीमंत अजून श्रीमंत, गरीब अजून गरीब.
  • कोणत्याही कामामध्ये सच्चेपणा, गुणवत्ता नाही.
  • भ्रष्टाचाराला खतपाणी मिळतं.
  • सेवा क्षेत्रं (आरोग्य, शिक्षण, शासकीय सेवा) यामध्ये प्रामाणिकपणा हरवतो.

उपाय काय?

समाजाने “स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी” ही भावनाच पुन्हा जागृत केली पाहिजे. त्यासाठी –

  • प्रत्येकाने आपल्या कार्यात सेवा-दृष्टीकोन ठेवणे
  • पालकांनी मुलांना मूल्यशिक्षण देणे
  • शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता समाजशीलता रुजवणे
  • धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते यांनी आत्मपरीक्षण करणे

संपत्ती मिळवण्यामध्ये गैर नाही, परंतु ती संपत्ती कशी मिळवली जाते आणि ती समाजाच्या हितासाठी किती उपयोगी पडते – याचं भान असणं आवश्यक आहे.

लेखक: अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता – आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

भारत हा लुटारूंचा देश बनत चालला आहे....?