आरक्षण नको म्हणणाऱ्यांनो आधी जातिव्यवस्था नष्ट करायला तयार आहात का?

Image
आरक्षण नको म्हणणाऱ्यांनो आधी जातिव्यवस्था नष्ट करायला तयार आहात का? आजकाल सोशल मीडियावर आरक्षणविरोधी अनेक संदेश व्हायरल होत आहेत. पण एक मूलभूत प्रश्न कोणी विचारत नाही — जर आरक्षण एवढं चुकीचं असेल, तर जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण तयार आहोत का? आरक्षण ही समस्या नाही, तर ती एका मोठ्या समस्येचा परिणाम आहे — जातिव्यवस्था . शतकानुशतकं काही समाजघटकांना शिक्षण, संधी आणि सन्मानापासून वंचित ठेवण्यात आलं. त्यामुळेच त्यांना समान संधी देण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले होते — “जाति नष्ट केली नाही, तर समानता कधीच येणार नाही.” मग प्रश्न असा आहे — जर आपण खरोखर समानता मानत असू, तर जात अजूनही का जिवंत आहे? लग्न, समाज, राजकारण यात अजूनही जात का ठरते? जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण कितपत प्रयत्न करतो? गरीबी जात पाहून येत नाही — हे खरे आहे. पण भारतात अनेक पिढ्यांपासून जातीनुसार अन्याय झाला आहे, हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच आरक्षण हे केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक न्यायाचं साधन आहे. आरक्...

शेतकरी, कष्टकरी: शापित सुतपुत्र

 

शेतकरी, कष्टकरी: शापित सुतपुत्र

  1. क्रिकेटपटू: एका षटकाराची किंमत – करोडो रुपये
  2. अभिनेता: एका अभिनयाची किंमत – करोडो रुपये
  3. पुढाऱ्यांचे पंचवार्षिक: किंमत – पुढील आठ पिढ्यांची सोय
  4. काळ्या धंद्यावाले व भ्रष्टाचारी: काहीही होवो… शेवटी दोन नंबर
  5. सरकारी अधिकारी: सेवा कशीही करा, मेवा मात्र रग्गड!
  6. शेतकरी व इतर कष्टकरी: कष्ट कितीही करा, परंतु फळ… दगडासमान!

कल्पना करा:
वरच्या पाच “पांडवांनी” काम थांबवले तर काय होईल? विशेष काही नाही; जास्तीत जास्त गैरसोय.
पण, खालचा सहावा दानवीर “कर्ण” जर म्हणाला, “मी काहीच करणार नाही,” तर काय होईल?
यांना भीक मागून देखील अन्न मिळणार नाही. आणि नोटांची किंमत फक्त “कागदाचे तुकडे” ठरेल.

अरे लोकशाही! वरचे पाच पांडव राजपुत्र असले तरी, खालचा सहावा कर्ण – शापित सुतपुत्र – समाजातील खरी शक्ती आहे.

अजब तुझे सरकार! अशा व्यवस्थेला जागा देणे चुकीचे आहे.

लेखक:-अरुण रामचंद्र पांगारकर,

प्रणेता,

गरीबी हटाव चळवळ 

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

भारत हा लुटारूंचा देश बनत चालला आहे....?