आरक्षण नको म्हणणाऱ्यांनो आधी जातिव्यवस्था नष्ट करायला तयार आहात का?

Image
आरक्षण नको म्हणणाऱ्यांनो आधी जातिव्यवस्था नष्ट करायला तयार आहात का? आजकाल सोशल मीडियावर आरक्षणविरोधी अनेक संदेश व्हायरल होत आहेत. पण एक मूलभूत प्रश्न कोणी विचारत नाही — जर आरक्षण एवढं चुकीचं असेल, तर जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण तयार आहोत का? आरक्षण ही समस्या नाही, तर ती एका मोठ्या समस्येचा परिणाम आहे — जातिव्यवस्था . शतकानुशतकं काही समाजघटकांना शिक्षण, संधी आणि सन्मानापासून वंचित ठेवण्यात आलं. त्यामुळेच त्यांना समान संधी देण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले होते — “जाति नष्ट केली नाही, तर समानता कधीच येणार नाही.” मग प्रश्न असा आहे — जर आपण खरोखर समानता मानत असू, तर जात अजूनही का जिवंत आहे? लग्न, समाज, राजकारण यात अजूनही जात का ठरते? जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण कितपत प्रयत्न करतो? गरीबी जात पाहून येत नाही — हे खरे आहे. पण भारतात अनेक पिढ्यांपासून जातीनुसार अन्याय झाला आहे, हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच आरक्षण हे केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक न्यायाचं साधन आहे. आरक्...

प्रत्येकाच्या कामाला योग्य दाम द्या, आणि प्रत्येकाकडून कर वसूल करा

 

 प्रत्येकाच्या कामाला योग्य दाम द्या, आणि प्रत्येकाकडून कर वसूल करा

महत्वाची सूचना: हा लेख प्रामाणिक राष्ट्रसेवकांसाठी नाही. त्यांनी मनाला लावून घेऊ नये.

देश चालतो तो केवळ करदात्यांच्या भरलेल्या पैशांवर नाही, तर शेतकरी, कंत्राटी कामगार आणि इतर कष्टकऱ्यांच्या शोषणातूनही! हे जळजळीत वास्तव आपण विसरून चालणार नाही.

"कमी काम, जास्त दाम" – हा प्रकारदेखील एका प्रकारचा फुकटखाऊपणा आहे.

कर भरणे म्हणजे देशावर उपकार करणे नव्हे.
खरे उपकारकर्ते तर शेतकरी आणि श्रमिक वर्गच आहेत.
तेच अन्न उगमवतात, तेच इमारती उभारतात, तेच उत्पादन करतात – त्यांच्या कष्टावरच समाज आणि अर्थव्यवस्था उभी आहे. पण तरीही, त्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला दिला जात नाही.

शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो, पण त्याच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाही.
कंत्राटी कामगारांना १६-१६ तास गुरांप्रमाणे राबवले जाते, पण वेतन अत्यल्प असते. कुठलाही सामाजिक सुरक्षा कवच दिला जात नाही.
या कामगारांच्या कष्टावरच ठेकेदार, दलाल आणि मालक वर्ग श्रीमंत होतो आहे.

हे पाहता, करदात्यांनी स्वतःच्या प्रामाणिकतेचा अहंकार करताना एकदा स्वतःला विचारावे –
"मी देशासाठी प्रामाणिक सेवा करतो का?" आणि "माझ्या सेवेला योग्य मोबदला मिळतो का?"

जर मिळत नसेल, तर तुमचाही शोषणाचाच भाग आहे — आणि ते शोषण बंद व्हायला हवे.


✍️ अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता,
आदर्श अर्थवितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी हटाव चळवळ

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

भारत हा लुटारूंचा देश बनत चालला आहे....?