Image
प्रज्ञेचा शोध की पदव्यांचा बाजार? – एका नव्या शैक्षणिक क्रांतीची गरज प्रत्येक मनुष्य एका विशिष्ट जन्मजात ओढीसह (Natural Inclination) जन्माला येतो. बौद्धिक प्रगल्भता ही केवळ प्रयत्नसाध्य नसून ती उपजत असते. जर केवळ प्रयत्नांनी कोणीही काहीही बनू शकला असता, तर आज गल्लीतले सर्व विद्यार्थी ‘अल्बर्ट आईन्स्टाईन’ झाले असते. पण वास्तव वेगळे आहे. "आजची शिक्षण पद्धती माणसाची नैसर्गिक प्रज्ञा ओळखण्याऐवजी तिला एका ठराविक साच्यात कोंबण्याचा प्रयत्न करत आहे." १. आजच्या शिक्षण पद्धतीची शोकांतिका शाळा आणि महाविद्यालये केवळ ‘माहितीचे साठे’ तयार करत आहेत. सृजनशीलतेचा विकास करण्याऐवजी मेंदूवर नाहक ताण दिला जात आहे. आजचे शिक्षण ‘सेवा’ देणारे तज्ज्ञ घडवण्याऐवजी, ‘पैसा’ कमावणारे रोबोट तयार करत आहे. पदवी मिळवण्यामागे सेवा हा भाव नसून पैसाच प्रेरणा ठरत आहे. २. कौशल्यपूर्ण आणि थेट शिक्षण: काळाची गरज आपल्याला अशा शिक्षण व्यवस्थेची गरज आहे जिथे शिक्षण केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष अनुभवाधार...

प्रत्येकाच्या कामाला योग्य दाम द्या, आणि प्रत्येकाकडून कर वसूल करा

 

 प्रत्येकाच्या कामाला योग्य दाम द्या, आणि प्रत्येकाकडून कर वसूल करा

महत्वाची सूचना: हा लेख प्रामाणिक राष्ट्रसेवकांसाठी नाही. त्यांनी मनाला लावून घेऊ नये.

देश चालतो तो केवळ करदात्यांच्या भरलेल्या पैशांवर नाही, तर शेतकरी, कंत्राटी कामगार आणि इतर कष्टकऱ्यांच्या शोषणातूनही! हे जळजळीत वास्तव आपण विसरून चालणार नाही.

"कमी काम, जास्त दाम" – हा प्रकारदेखील एका प्रकारचा फुकटखाऊपणा आहे.

कर भरणे म्हणजे देशावर उपकार करणे नव्हे.
खरे उपकारकर्ते तर शेतकरी आणि श्रमिक वर्गच आहेत.
तेच अन्न उगमवतात, तेच इमारती उभारतात, तेच उत्पादन करतात – त्यांच्या कष्टावरच समाज आणि अर्थव्यवस्था उभी आहे. पण तरीही, त्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला दिला जात नाही.

शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो, पण त्याच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाही.
कंत्राटी कामगारांना १६-१६ तास गुरांप्रमाणे राबवले जाते, पण वेतन अत्यल्प असते. कुठलाही सामाजिक सुरक्षा कवच दिला जात नाही.
या कामगारांच्या कष्टावरच ठेकेदार, दलाल आणि मालक वर्ग श्रीमंत होतो आहे.

हे पाहता, करदात्यांनी स्वतःच्या प्रामाणिकतेचा अहंकार करताना एकदा स्वतःला विचारावे –
"मी देशासाठी प्रामाणिक सेवा करतो का?" आणि "माझ्या सेवेला योग्य मोबदला मिळतो का?"

जर मिळत नसेल, तर तुमचाही शोषणाचाच भाग आहे — आणि ते शोषण बंद व्हायला हवे.


✍️ अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता,
आदर्श अर्थवितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी हटाव चळवळ

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

MSP क्यों आवश्यक है?