आरक्षण नको म्हणणाऱ्यांनो आधी जातिव्यवस्था नष्ट करायला तयार आहात का?

Image
आरक्षण नको म्हणणाऱ्यांनो आधी जातिव्यवस्था नष्ट करायला तयार आहात का? आजकाल सोशल मीडियावर आरक्षणविरोधी अनेक संदेश व्हायरल होत आहेत. पण एक मूलभूत प्रश्न कोणी विचारत नाही — जर आरक्षण एवढं चुकीचं असेल, तर जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण तयार आहोत का? आरक्षण ही समस्या नाही, तर ती एका मोठ्या समस्येचा परिणाम आहे — जातिव्यवस्था . शतकानुशतकं काही समाजघटकांना शिक्षण, संधी आणि सन्मानापासून वंचित ठेवण्यात आलं. त्यामुळेच त्यांना समान संधी देण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले होते — “जाति नष्ट केली नाही, तर समानता कधीच येणार नाही.” मग प्रश्न असा आहे — जर आपण खरोखर समानता मानत असू, तर जात अजूनही का जिवंत आहे? लग्न, समाज, राजकारण यात अजूनही जात का ठरते? जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण कितपत प्रयत्न करतो? गरीबी जात पाहून येत नाही — हे खरे आहे. पण भारतात अनेक पिढ्यांपासून जातीनुसार अन्याय झाला आहे, हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच आरक्षण हे केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक न्यायाचं साधन आहे. आरक्...

असे झाले तरच शेतकऱ्यांसाठी शेतीव्यवसाय फायद्याचा ठरेल!

 

असे झाले तरच शेतकऱ्यांसाठी शेतीव्यवसाय फायद्याचा ठरेल!


अन्न निर्मितीसाठी शेती पिकवण्यासाठी रात्रंदिवस राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर व्यापारी आणि दलाल श्रीमंत होत आहेत. मात्र शेतकरी गरीबच रहात आहेत. याचे कारण एकच ते म्हणजे शेतमालाला हमीभाव न मिळणे हे होय.

यावर उपाय एकच — तो म्हणजे शेतकरी आणि व्यापारी यांनी एकत्रित रित्या काम करणे. शेतकरी आणि व्यापारी या दोघांच्या कामात सुसूत्रता येणे आवश्यक आहे.

सध्याची परिस्थिती अशी आहे की व्यापारी शेतकऱ्यांकडून अल्प दरात शेतमाल खरेदी करतात आणि स्वतः मात्र तो चढ्या दराने विकतात. काही अपवादात्मक प्रसंगी शेतमालाची आवक कमी झाली तर शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळतो. पण हा झुगारीसारखा प्रकार आहे — ढाय लागली… तर लागली! हा बेभरवशाचा प्रकार योग्य नाही.

उपाययोजना:

  1. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल ताब्यात घ्यावा.
  2. तो शेतमाल त्यांच्या व्यापारी भावात बाहेर विकावा.
  3. सदर शेतमाल विकल्यानंतर आलेल्या रकमेतून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि व्यापाऱ्यांचा दळणवळण व अन्य खर्च वजा करण्यात यावा.
  4. उरलेली रक्कम शेतकरी व व्यापारी यांची मेहनत व झालेला खर्च यांच्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी यांच्यात वितरित करण्यात यावी.
  5. बाजारभावाच्या अभ्यासानुसार व्यापाऱ्यांनी शेतमाल पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना अभिप्राय (फीडबॅक) द्यावा, जेणेकरून मागणी आणि पुरवठा यांचा मेळ साधला जाईल आणि अतिरिक्त आवक होणार नाही.

असे झाले तर नक्कीच शेतीव्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल, जो सध्या केवळ व्यापारी आणि दलाल यांच्यासाठीच फायद्याचा ठरत आहे.

– अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता, आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी निर्मूलन चळवळ

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

भारत हा लुटारूंचा देश बनत चालला आहे....?