Image
प्रज्ञेचा शोध की पदव्यांचा बाजार? – एका नव्या शैक्षणिक क्रांतीची गरज प्रत्येक मनुष्य एका विशिष्ट जन्मजात ओढीसह (Natural Inclination) जन्माला येतो. बौद्धिक प्रगल्भता ही केवळ प्रयत्नसाध्य नसून ती उपजत असते. जर केवळ प्रयत्नांनी कोणीही काहीही बनू शकला असता, तर आज गल्लीतले सर्व विद्यार्थी ‘अल्बर्ट आईन्स्टाईन’ झाले असते. पण वास्तव वेगळे आहे. "आजची शिक्षण पद्धती माणसाची नैसर्गिक प्रज्ञा ओळखण्याऐवजी तिला एका ठराविक साच्यात कोंबण्याचा प्रयत्न करत आहे." १. आजच्या शिक्षण पद्धतीची शोकांतिका शाळा आणि महाविद्यालये केवळ ‘माहितीचे साठे’ तयार करत आहेत. सृजनशीलतेचा विकास करण्याऐवजी मेंदूवर नाहक ताण दिला जात आहे. आजचे शिक्षण ‘सेवा’ देणारे तज्ज्ञ घडवण्याऐवजी, ‘पैसा’ कमावणारे रोबोट तयार करत आहे. पदवी मिळवण्यामागे सेवा हा भाव नसून पैसाच प्रेरणा ठरत आहे. २. कौशल्यपूर्ण आणि थेट शिक्षण: काळाची गरज आपल्याला अशा शिक्षण व्यवस्थेची गरज आहे जिथे शिक्षण केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष अनुभवाधार...

असे झाले तरच शेतकऱ्यांसाठी शेतीव्यवसाय फायद्याचा ठरेल!

 

असे झाले तरच शेतकऱ्यांसाठी शेतीव्यवसाय फायद्याचा ठरेल!


अन्न निर्मितीसाठी शेती पिकवण्यासाठी रात्रंदिवस राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर व्यापारी आणि दलाल श्रीमंत होत आहेत. मात्र शेतकरी गरीबच रहात आहेत. याचे कारण एकच ते म्हणजे शेतमालाला हमीभाव न मिळणे हे होय.

यावर उपाय एकच — तो म्हणजे शेतकरी आणि व्यापारी यांनी एकत्रित रित्या काम करणे. शेतकरी आणि व्यापारी या दोघांच्या कामात सुसूत्रता येणे आवश्यक आहे.

सध्याची परिस्थिती अशी आहे की व्यापारी शेतकऱ्यांकडून अल्प दरात शेतमाल खरेदी करतात आणि स्वतः मात्र तो चढ्या दराने विकतात. काही अपवादात्मक प्रसंगी शेतमालाची आवक कमी झाली तर शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळतो. पण हा झुगारीसारखा प्रकार आहे — ढाय लागली… तर लागली! हा बेभरवशाचा प्रकार योग्य नाही.

उपाययोजना:

  1. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल ताब्यात घ्यावा.
  2. तो शेतमाल त्यांच्या व्यापारी भावात बाहेर विकावा.
  3. सदर शेतमाल विकल्यानंतर आलेल्या रकमेतून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि व्यापाऱ्यांचा दळणवळण व अन्य खर्च वजा करण्यात यावा.
  4. उरलेली रक्कम शेतकरी व व्यापारी यांची मेहनत व झालेला खर्च यांच्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी यांच्यात वितरित करण्यात यावी.
  5. बाजारभावाच्या अभ्यासानुसार व्यापाऱ्यांनी शेतमाल पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना अभिप्राय (फीडबॅक) द्यावा, जेणेकरून मागणी आणि पुरवठा यांचा मेळ साधला जाईल आणि अतिरिक्त आवक होणार नाही.

असे झाले तर नक्कीच शेतीव्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल, जो सध्या केवळ व्यापारी आणि दलाल यांच्यासाठीच फायद्याचा ठरत आहे.

– अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता, आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी निर्मूलन चळवळ

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

MSP क्यों आवश्यक है?