Corrupt Democracy, Degraded Public

Image
  Shramik Kranti – Garibon Ka Aawaz Corrupt Democracy, Degraded Public Blaming political leaders alone for the failure of democracy is an act of self-deception. Criminal, corrupt, and morally degraded leaders do not descend from the sky — they are produced through the ballot box . When people knowingly vote for individuals with criminal backgrounds, those who are imprisoned, or those accused of serious crimes such as murder, it is no longer a mere political choice — it becomes a public declaration of moral failure . Moral degradation is not the monopoly of political leaders alone. A public that votes for selfish interests, money, or criminal power corrupts democracy itself . Voting is not merely a right; it is a moral responsibility . When this sense of responsibility collapses, democracy is reduced to a game of numbers. Votes cast in exchange for money, liquor, caste considerations, or fear are nothing less than the abduction of democracy . ...

नीच जनता, भ्रष्ट लोकशाही

Shramik Kranti – Garibon Ka Aawaz

 

नीच जनता, भ्रष्ट लोकशाही



लोकशाहीतील सगळा दोष केवळ पुढाऱ्यांवर ढकलणे हे आत्मफसवणूक आहे. कारण गुन्हेगार, भ्रष्ट आणि नैतिकदृष्ट्या अधःपतन झालेले पुढारी आकाशातून पडत नाहीत — ते मतपेटीतून घडवले जातात.

जेव्हा जनता जाणूनबुजून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, तुरुंगात असलेल्या किंवा खुनाचे आरोप असलेल्या व्यक्तींना मत देते, तेव्हा तो केवळ राजकीय निर्णय राहत नाही — तो नैतिक अपयशाचा जाहीर स्वीकार ठरतो.

नीचता ही फक्त पुढाऱ्यांची ओळख नसते.
स्वार्थासाठी, पैशासाठी आणि गुन्हेगारीला मत देणारी जनता
लोकशाहीला भ्रष्ट करते.

मतदान हा केवळ हक्क नाही, ते नैतिक कर्तव्य आहे. तो कर्तव्यभाव हरवला की लोकशाही केवळ आकड्यांचा खेळ बनते. दारू, पैसे, जातीचे आमिष किंवा दबाव स्वीकारून दिलेले मत हे लोकशाहीचे अपहरणच आहे.

अशा परिस्थितीत “जनता भोळी आहे”, “जनतेला फसवले गेले” असे म्हणणे हे वास्तवाला झाकण्यासारखे आहे. ही अज्ञानाची नव्हे, तर जाणीवपूर्वक स्वीकारलेली नालायकी आहे.

जो समाज स्वतःच्या हाताने गुन्हेगारांना सत्तेत बसवतो, त्याला नंतर देश, समाज, मूल्ये आणि नैतिकतेची भाषा करण्याचा नैतिक अधिकार उरत नाही.

गुन्हेगारांना मत देणारी जनता
आणि भ्रष्ट पुढारी —
ही लोकशाहीची दोन बाजू नाहीत,
तो एकाच नाण्याचा परिणाम आहे.

श्रमिक क्रांती – गरिबांचा आवाज ही भूमिका स्पष्टपणे मांडते — लोकशाही वाचवायची असेल, तर आधी मतदाराची नैतिकता जागी करावी लागेल.

शिवाय, केवळ पुढारी वा सत्ता बदलून उपयोग नाही

 व्यवस्था बदलली पाहिजे. सत्ता कुणाचीही असो, फरक पडू नये — व्यवस्था इतकी मजबूत, सक्षम आणि नैतिकदृष्ट्या आदर्श असावी की ठरवून देखील कुणालाही भ्रष्टाचार करता येऊ नये.

अशा व्यवस्थेतूनच खऱ्या अर्थाने गरिबी निर्मूलन शक्य आहे. अशा व्यवस्थेतूनच  प्रत्येक देशबांधव खऱ्या अर्थाने सुखी, सुरक्षित आणि समृद्ध होऊ शकतो. देश प्रगतीपथावर जाऊ शकतो आणि विकास हा केवळ आकड्यांपुरता न राहता जनतेच्या जीवनात उतरतो.

अशा व्यवस्थेसाठी राजकारण पुरेसे नाही.
अशा व्यवस्थेसाठी राजक्रांतीची गरज आहे.

ही राजक्रांती कोणताही पुढारी, कोणताही पक्ष, किंवा कोणताही सत्ताधारी वर्ग घडवू शकत नाही. ती क्रांती गोरगरीब, कष्टकरी आणि श्रमिक वर्गालाच घडवून आणावी लागेल ज्यांच्या कामावर आणि घामावर हा देश खऱ्या अर्थाने उभा आहे.

कारण जे श्रीमंत आहेत, जे सत्तेच्या जवळ आहेत, त्यांना देशातील गोरगरिबांच्या हालअपेष्टांशी काहीही देणेघेणे नाही. ते सुरक्षित आहेत, सुखात आहेत — म्हणून व्यवस्थेच्या बदलाची त्यांना गरज वाटत नाही.

म्हणूनच व्यवस्था बदलण्याची लढाई ही श्रमिकांची जबाबदारी आहे, आणि तोच खरा देशभक्तीचा मार्ग आहे.

—लेखक : अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता : श्रमिक क्रांती – गरिबांचा आवाज 

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

MSP क्यों आवश्यक है?