भारत हा लुटारूंचा देश बनत चालला आहे....?
भारत हा लुटारूंचा देश बनत चालला आहे....? हा लेख आपल्या देशाची निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या देशभक्त भारतीयांसाठी नाही. त्यामुळे त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. बहुसंख्य भारतीय प्रत्येक काम केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच करत असतात. पैसा मिळवणे हाच त्या कामामागील हेतू असतो. त्या कामामागे राष्ट्रभावना अजिबात नसते. दुसऱ्याचं काहीही होवो, पण मला फक्त पैसा मिळायला हवा ही स्वार्थी भावना प्रत्येक कामात असल्यामुळे ते काम नि:स्वार्थ सेवा न ठरता फक्त स्वार्थयुक्त व्यवसाय ठरतो. प्रत्येक कामातून पैसा तर मिळायलाच हवा कारण पैसा मिळाला नाही तर जीवन चरितार्थ चालणार नाही. पण म्हणून आपल्या हातून होणारे काम म्हणजे केवळ आपल्या स्वतःचा जीवनचरित्रार्थ चालवण्याचे साधन असू शकत नाही, तर त्या कामाचा अन्य माणसांना देखील उपयोग होत असतो. म्हणून आपल्या हातून होणारे काम इतरांना उपकारक ठरेल अशी गुणवत्ता त्यात असावी आणि त्याचा इतरांना सहजासहजी लाभ घेता येईल अशी योग्य मूल्यकारकता देखील त्या कामात असायला हवी. पण भारतात अशी आदर्श परिस्थिती नाही. भारतीय माणसा...
Comments
Post a Comment
✊ आपले विचार खाली नोंदवा. श्रमिकांच्या हक्कासाठी एक विधायक विचारही परिवर्तन घडवू शकतो. सभ्य आणि विचारशील प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.
✊ अपने विचार नीचे दर्ज करें। श्रमिकों के अधिकारों के लिए आपका एक सकारात्मक विचार भी परिवर्तन ला सकता है। शालीन और रचनात्मक टिप्पणियों का स्वागत है।
✊ Share your thoughts below. Even a single constructive idea can bring change for workers’ rights. Respectful and meaningful comments are always welcome.