गरीबांच्या ताटावर चर्चा, पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मौन

Image
  गरीबांच्या ताटावर चर्चा, पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मौन आजच्या समाजात एक विचित्र आणि वेदनादायक चित्र दिसते. गरीब माणसाला सरकारकडून काही किलो मोफत धान्य मिळाले, एखादी शिष्यवृत्ती मिळाली किंवा एखादी योजना मिळाली की लगेच काही लोक त्याला “फुकटखाऊ” म्हणू लागतात. पण दुसऱ्या बाजूला जनतेच्या पैशांवर डल्ला मारणारे, लाखो रुपयांचा पगार घेऊनही लाचखोरी करणारे अधिकारी आणि विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधींचे कमिशन लाटणारे भ्रष्ट पुढारी यांच्याबद्दल मात्र समाजात तितक्याच तीव्रतेने चर्चा होताना दिसत नाही. गरीबांच्या ताटावर चर्चा होते; पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मात्र मौन पाळले जाते. हीच आपल्या व्यवस्थेची आणि सामाजिक मानसिकतेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. गरीब मदत घेतो, कारण परिस्थिती त्याला भाग पाडते एखादा शेतकरी दुष्काळामुळे उद्ध्वस्त होतो. एखादा मजूर रोजंदारी नसल्यामुळे उपाशी झोपतो. एखादी विधवा महिला, वृद्ध व्यक्ती किंवा बेरोजगार युवक शासनाच्या योजनेचा आधार घेतो. हे लोक मदत घेतात कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यांना मोफत धान्य, शिष्यवृत्ती किंवा अनुदान ही चैनीची...

महानायका सुभाषचंद्रा, स्वातंत्र्यलढ्याच्या तेजस्वी इतिहासाचे काव्यरूप दर्शन

Shramik Kranti – Garibon Ka Aawaz महानायका सुभाषचंद्रा | नेताजी सुभाषचंद्र बोस काव्यांजली

महानायका सुभाषचंद्रा!!

नेताजींच्या पवित्र चरणी हे काव्यसुमन!!!!

महानायका सुभाषचंद्रा देशाची तू शान!!
शब्दही पडती तुला अपुरे असे तुझे महिमान।।धृ।।

शूर सिंह तू वीर अलौकिक शौर्याची रे खाण,
तव कार्याला साक्ष आजही जर्मनी आणि जपान
नतमस्तक हा तुझिया चरणी सारा हिंदुस्थान।।१।।

तू तळपता सूर्य नभीचा, धगधगता अंगार,
चटक्यांनी तुझिया वितळले ब्रिटिशांचे सरकार
मुक्त कराया मातृभूमीला पेटवले तू रान।।२।।

सुटला कैदेमधून तू रे मौलवीच्या वेषात,
पेटाऱ्यातून जणू निसटले शिवरायच साक्षात
धन्य जाहली भारतमाता अजोड त्या करणीनं।।३।।

रावळपिंडीहूनी निघाला बनून झियाउद्दीन,
भगतराम तलवार जोडीला, झाला जो रहिमतखान
नामांतर, वेषांतर करुनी बनलाशी अफगाण।।४।।

अफगाणाहून जर्मनीस मग केलेस तू प्रयाण,
वावरला जर्मनीत ओरलँडो मॅझूटा बनून
राबवले रे तेथून नवक्रांतीचे अभियान।।५।।

जरी मिळवला हिटलरच्या तू हातामध्ये हात,
पेटवली त्या असंख्य हृदयी देशभक्तीची ज्योत
युद्धकैद्यांमध्ये फुंकला देशभक्तीचा प्राण।।६।।

जपानात जाऊन स्थापिली आझाद हिंद सेना,
लक्ष लक्ष हृदयात पेरली त्यागाची भावना
प्राणपणाने लढू लागले वीर अमर ते जवान।।७।।

घुमला नारा ‘चलो दिल्लीचा’ चढले स्फुरण वीरा,
तोडीत बेड्या करू लागले मुक्त आपुली धरा
हटू लागला मागे मागे ब्रिटिशरुपी हैवान।।८।।

सुरू जाहला पण नियतीचा खेळ नवा तो क्रूर,
जपान हरले महासंगरी अन् पालटला नुर
आग न विझली तव क्रांतीची, पसरे कणाकणानं।।९।।

तव स्फूर्तीने पेटून उठले इथले लक्ष जवान,
संप जाहले तीनही दलांचे, ब्रिटीश झुकवी मान
अन् उगवला अखेर भूवर स्वातंत्र्याचा दिन।।१०।।

धन्य, धन्य रे सुभाषबाबू, धन्य तुझी रे धन्य!!
जनक तूच रे स्वातंत्र्याचा, तुझे विरोधक शून्य!!!!

नेताजी सुभाषचंद्र बोस की जय!!

महानायक सुभाषचंद्र बोस यांना कोटी कोटी प्रणाम!!

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

Poisoned Food, Rising Cancer and Chemical Farming: This Is Not Just a Mistake, It Is a Crime