शिवशाहीचा न्याय आणि आजची व्यवस्था

Shramik Kranti – Garibon Ka Aawaz

शिवशाहीचा न्याय आणि आजची व्यवस्था

जो नराधमांना रडवतो धायधाय — त्याचं नाव न्याय!

जो नराधमांना जोडायला लावतो हात आणि धरायला लावतो पाय — त्याचं नाव न्याय!

असा होता आपल्या राजांचा न्याय. म्हणूनच आजही नाही त्यांच्या आदर्श शिवशाहीला पर्याय!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या न्यायाचा अर्थ होता — एकाला शासन आणि बाकीच्यांना धडा.


⚖ राजांच्या न्यायव्यवस्थेची पाच वैशिष्ट्ये

  • विनामूल्य न्याय – न्यायासाठी पैशाचा अडसर नव्हता.

  • तत्काळ न्याय – विलंब नव्हे, त्वरित निर्णय.

  • शाब्दिक युक्तीवादाला थारा नव्हता – सत्याला सर्वोच्च स्थान.

  • न्यायाची दहशत – गुन्हेगार भयभीत.

  • कुटुंबाची जबाबदारी –गुन्हेगाराच्या निरपराध कुटुंबाचे पालनपोषण व संरक्षण.
ज्या न्यायव्यवस्थेत साक्षीदार फुटतात आणि पुराव्याअभावी गुन्हेगार सुटतात — ती न्यायव्यवस्था असून नसल्यासारखीच.

💰 राजांचा आर्थिक न्याय

राजांनी रयतेला फक्त सबसिडी दिली नाही; देशप्रेमाचे संस्कार दिले.

फक्त काम दिले नाही; कामाला योग्य दाम दिले.

आज गरिबीचे खरे कारण कामांची कमतरता नाही, तर कामाला योग्य मोबदला न मिळणे हे आहे.

🏛 लोकशाही की राजेशाही — खरा प्रश्न

संस्कारहीन लोकांच्या भ्रष्ट लोकशाहीपेक्षा संस्कारक्षम, देशप्रेमी राजाची आदर्श राजेशाही कधीही चांगली नाही का?

लोकशाही ही केवळ मतदानाची पद्धत नसून ती संस्कारित आणि जबाबदार नागरिकांवर उभी असते.


आज गरज आहे — शिवशाहीच्या मूल्यांची, न्यायप्रियतेची आणि रयतेप्रती बांधिलकीची!
✍ लेखक
अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता – श्रमिक क्रांती मिशन – गरीबांचा आवाज

Comments