Current Politics and My Stand From Family Loyalty to Village Unity: The Need of the Hour

Image
Current Politics and My Stand From Family Loyalty to Village Unity: The Need of the Hour When I think about the future of our village, one reality becomes clear: for many years, local politics has revolved more around family groups, personal loyalties, and social prestige than around development, education, drinking water, employment, sanitation, and public welfare. Development Lost in Family Rivalries During elections, villages are often divided into groups and factions. Many people vote not on the basis of development, performance, or vision, but on the basis of family affiliations and personal loyalties. As a result, elections come and go, leaders change, and power shifts hands, but the basic problems of the village remain unresolved. Issues such as drinking water...

प्रचलित राजकारण व माझी भूमिका भाऊबंधकीकडून गावबंधकीकडे वळणे ही काळाची गरज

Shramik Kranti – Garibon Ka Aawaz

प्रचलित राजकारण व माझी भूमिका

भाऊबंधकीकडून गावबंधकीकडे वळणे ही काळाची गरज


गावाच्या विकासाचा विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, आपल्या गावातील राजकारण अनेक वर्षांपासून विकास, शिक्षण, पाणी, रोजगार, स्वच्छता आणि ग्रामहित यांसारख्या मूलभूत प्रश्नांभोवती फिरत नाही. त्याऐवजी ते घराणेशाही, भाऊबंदकी आणि तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेभोवती फिरत आले आहे.

घराण्यांच्या स्पर्धेत हरवलेला विकास

निवडणूक आली की गाव दोन किंवा अधिक गटांत विभागले जाते. मतदार विकासाच्या मुद्द्यांवर नव्हे, तर "आपले घराणे", "आपला गट", "आपला माणूस" या भावनांवर मतदान करतो. परिणामी निवडणूक संपते, सत्ता बदलते, चेहरे बदलतात; पण गावातील समस्या मात्र तशाच राहतात.

पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, शिक्षण, रोजगार, सार्वजनिक आरोग्य यांसारख्या प्रश्नांपेक्षा घराण्यांच्या प्रतिष्ठेच्या लढाया अधिक महत्त्वाच्या बनतात. यात सर्वात मोठे नुकसान गावाचे होते.

सरपंचपद म्हणजे सत्ता नव्हे, जबाबदारी

काही ठिकाणी आजही राजकारणाकडे सेवाभावाने नव्हे तर प्रतिष्ठेच्या स्पर्धेप्रमाणे पाहिले जाते. एखादी व्यक्ती सरपंच झाली की संपूर्ण गट स्वतःचा विजय समजतो. परंतु सरपंचपद हे गावाच्या सेवेसाठी आहे, प्रतिष्ठा मिरवण्यासाठी नाही.

सरपंच म्हणजे गावाचा मालक नाही, तर गावाचा पहिला सेवक आहे.

भाऊबंधकीकडून गावबंधकीकडे

आज काळ बदलला आहे. आता प्रश्न असा नाही की कोणत्या घराण्याचा उमेदवार निवडून येतो. प्रश्न असा आहे की गावाच्या समस्या कोण सोडवतो.

आपण प्रथम गावाचे नागरिक आहोत, नंतर कोणत्याही घराण्याचे. गावाचा विकास हा कोणत्याही एका घराण्याचा, जातीचा किंवा गटाचा विषय नसून संपूर्ण गावाचा विषय आहे.

आता स्वतःला एक प्रश्न विचारूया...

  • आपण मतदान विकासासाठी करतो की घराण्यासाठी?
  • आपण काम करणारा माणूस निवडतो की फक्त "आपला माणूस"?
  • गावाचा विचार मोठा की गटाचा विचार?

माझी भूमिका स्पष्ट आहे

  • मला घराण्यांचे राजकारण नको आहे.
  • मला गटबाजीचे राजकारण नको आहे.
  • मला व्यक्तिपूजेचे राजकारण नको आहे.
  • मला गावाच्या विकासाचे राजकारण हवे आहे.
  • मला पारदर्शक आणि उत्तरदायी ग्रामपंचायत हवी आहे.
  • मला प्रत्येक नागरिकाचा सन्मान करणारी व्यवस्था हवी आहे.

भाऊबंधकी नव्हे, गावबंधकी!

व्यक्तिपूजा नव्हे, विकासपूजा!

चला, आदर्श पांगरी घडवण्यासाठी एकत्र येऊया.


✍️ अरुण रामचंद्र पांगारकर
श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज

Comments