गरीबांच्या ताटावर चर्चा, पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मौन

Image
  गरीबांच्या ताटावर चर्चा, पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मौन आजच्या समाजात एक विचित्र आणि वेदनादायक चित्र दिसते. गरीब माणसाला सरकारकडून काही किलो मोफत धान्य मिळाले, एखादी शिष्यवृत्ती मिळाली किंवा एखादी योजना मिळाली की लगेच काही लोक त्याला “फुकटखाऊ” म्हणू लागतात. पण दुसऱ्या बाजूला जनतेच्या पैशांवर डल्ला मारणारे, लाखो रुपयांचा पगार घेऊनही लाचखोरी करणारे अधिकारी आणि विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधींचे कमिशन लाटणारे भ्रष्ट पुढारी यांच्याबद्दल मात्र समाजात तितक्याच तीव्रतेने चर्चा होताना दिसत नाही. गरीबांच्या ताटावर चर्चा होते; पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मात्र मौन पाळले जाते. हीच आपल्या व्यवस्थेची आणि सामाजिक मानसिकतेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. गरीब मदत घेतो, कारण परिस्थिती त्याला भाग पाडते एखादा शेतकरी दुष्काळामुळे उद्ध्वस्त होतो. एखादा मजूर रोजंदारी नसल्यामुळे उपाशी झोपतो. एखादी विधवा महिला, वृद्ध व्यक्ती किंवा बेरोजगार युवक शासनाच्या योजनेचा आधार घेतो. हे लोक मदत घेतात कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यांना मोफत धान्य, शिष्यवृत्ती किंवा अनुदान ही चैनीची...

 

डोंगरांच्या कुशीत शाळा-कॉलेज आणि पर्यावरणाचा ह्रास

डोंगरांच्या कुशीत शाळा-कॉलेज आणि पर्यावरणाचा ह्रास

आज अनेक नेते मंडळी स्वतःच्या व्यक्तिगत आर्थिक फायद्यासाठी डोंगरांच्या कुशीत व जंगल परिसरात स्वस्तात जमीन विकत घेतात आणि तेथे खासगी शाळा, कॉलेज तसेच व्यापारी प्रकल्प उभारतात. बाहेरून पाहता हे शिक्षणाच्या प्रसाराचे व "प्रगती"चे प्रतीक वाटते, परंतु खरे चित्र काही वेगळे आहे.

अशा प्रकारे उभारण्यात आलेल्या खासगी शिक्षण संस्था म्हणजे काही फार मोठी समाजसेवा वा देशसेवा नसून व्यक्तिगत स्वार्थापोटी जास्तीत जास्त संपत्ती जमा करण्याची सोय आहे. शिक्षणाच्या पवित्र कार्याला नफा मिळविण्याचे साधन बनवणे हे समाजासाठी धोकादायक आहे.

शाळा किंवा कॉलेज उभारण्यासाठी डोंगरकपारींमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. डोंगरांची नैसर्गिक रचना बिघडवली जाते. नैसर्गिक पाणवठे, ओढे, जैवविविधता आणि प्राणिजीवन यावर थेट परिणाम होतो. दीर्घकालीन दृष्टीने पाहता हा प्रकार पर्यावरणीय असंतुलन निर्माण करणारा आहे.

शिक्षण संस्था समाजासाठी आवश्यक आहेत, याबद्दल कुणालाही शंका नाही. मात्र त्यासाठी डोंगरांचा आणि जंगलांचा बळी देणे कितपत योग्य आहे? शिक्षणाचा खरा उद्देश समाजाची प्रगती, संस्कार आणि टिकाऊ विकास घडवणे हा आहे. जर या नावाखाली पर्यावरणाचा नाश झाला तर त्या शिक्षणाचे उद्दिष्ट अधुरे राहते.

त्यामुळे शाळा-कॉलेज उभारणीसाठी पर्यायी जागांचा वापर करणे, पर्यावरणपूरक बांधकाम करणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा समतोल राखणे हीच खरी प्रगती होय. अन्यथा भविष्यात या "प्रगतीच्या" नावाखाली आपल्यालाच दुष्परिणाम भोगावे लागतील. हे लक्षात घेतलं पाहिजे की नेत्यांच्या अशा खासगी शिक्षण संस्था या प्रत्यक्षात व्यक्तिगत संपत्ती जमविण्याचे साधन आहेत, समाजहिताचा वा देशहिताचा त्यात फारसा संबंध नाही.

– श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

Poisoned Food, Rising Cancer and Chemical Farming: This Is Not Just a Mistake, It Is a Crime