Access Roads in Agriculture: A Complex Problem

Image
  Access Roads in Agriculture: A Complex Problem Agriculture in rural areas is not just a profession but a foundation of life. However, a serious and growing issue that is striking at the root of farming is the dispute over access roads (vahivati raste) . In many places today, some farmers, driven by greed to acquire more land, are blocking the traditional access roads of neighboring farmers. Farming Without Roads – A Harsh Reality Farming requires the movement of tractors, bullock carts, harvesters, pickups, and other machinery to reach the fields. But without proper access roads, farming becomes nearly impossible. In such situations, affected farmers approach the revenue department seeking justice. Role of Administration – Doubt and Disappointment Incorrect or misleading records are issued by the land records department. Decisions at the Tehsildar or Sub-Divisional Officer level often do no...

विकासाच्या नावाखाली सिमेंटची जंगलं की निसर्गाशी सुसंवादी घरे?

Shramik Kranti – Garibon Ka Aawaz

विकासाच्या नावाखाली सिमेंटची जंगलं की निसर्गाशी सुसंवादी घरे?

आज “विकास” या शब्दाचा अर्थ उंच इमारती, रुंद रस्ते आणि सिमेंट-काँक्रीट एवढ्यावरच मर्यादित केला गेला आहे. शहर असो वा गाव, मळा असो वा डोंगर — सर्वत्र एकच चित्र दिसते : सिमेंटची जंगलं. पण प्रश्न असा आहे की, हा विकास माणसाच्या, शेतीच्या आणि निसर्गाच्या आरोग्यासाठी आहे का?

नद्या, ओढे आणि वाळू : पाण्याचं नैसर्गिक आरोग्य हरवलं

अतिरेकी बांधकामामुळे नद्या आणि ओढ्यांमधील वाळू जवळजवळ संपली आहे. वाळू म्हणजे केवळ बांधकामाचं साहित्य नाही; ती पाण्याची नैसर्गिक गाळणी आहे.

वाळू नाहीशी झाली, म्हणजे पाणी गाळलं जात नाही. परिणामी आज अनेक ठिकाणी विहिरीचं पाणी पिण्यालायक नाही, शेतीला देण्यालायकही नाही. हा विकास नाही; हा पाण्याविरुद्ध केलेला सामूहिक गुन्हा आहे.

मळ्यात बंगले : गरज नाही, प्रतिष्ठेची स्पर्धा

पूर्वी मळा म्हणजे कामाची जागा होती आणि घर म्हणजे साधं, उपयोगी, निसर्गाशी जुळलेलं आश्रयस्थान.

आज मात्र मळ्यातही शहरासारखे बंगले हवेत. हे गरजेपोटी नाही, तर दाखवण्याच्या स्पर्धेपोटी आहे.

या स्पर्धेची किंमत निसर्ग, शेती आणि पुढच्या पिढ्या मोजत आहेत.

नैसर्गिक घरे : कमी खर्च, जास्त आरोग्य

पूर्वीची घरे मातीच्या भेंड्यांची, छप्पर बांबू, लाकूड, ऊसाचे पाचट वापरून बांधली जात.

ती फार दीर्घकाळ टिकत नसत, पण:

  • खर्चिक नव्हती
  • कर्जाशिवाय उभी राहत
  • उष्णता-थंडी नैसर्गिकरीत्या नियंत्रित करत
  • आरोग्यदायी होती

प्रत्येक पिढीला स्वतःचं घर उभारण्याची संधी मिळत होती. म्हणजे कष्टापासून सुटका नव्हती, आणि तीच गोष्ट माणूस घडवत होती.

आठ पिढ्यांसाठी घर… पण कष्टाची प्रेरणा?

आज अशी घरे बांधली जातात की ती आठ-आठ पिढ्या टिकतील. पण जर पुढच्या पिढ्यांना सर्व काही तयार मिळालं, तर कष्ट करण्याची, घडण्याची प्रेरणा राहील का?

घर मजबूत असणं वाईट नाही; पण त्यासाठी माणूस जर आयुष्यभर कर्ज फेडण्यात अडकला, तर ते घर आश्रय न राहता बंधन बनतं.

२५–३० वर्षं कर्ज फेडण्यात जाणं म्हणजे जवळजवळ संपूर्ण हयातच.

मातीचे भेंडे : जमीन खात नाहीत

विट उद्योगामुळे सुपीक जमीन कायमची कमी होते. विटांसाठी घेतलेली माती भाजली जाते आणि शेतीसाठी कायमची नष्ट होते.

मातीच्या भेंड्यांचा मोठा फायदा असा की:

  • माती भाजली जात नाही
  • घर मोडलं तरी तीच माती पुन्हा वापरता येते
  • जमीन आणि माती कमी होत नाही

हे निसर्गस्नेही आणि शाश्वत आहे.

शेण आणि माती : विसरलेलं आरोग्यशास्त्र

फरशीच्या घरांपेक्षा शेणाने सारवलेली घरे अधिक आरोग्यदायी असतात.

रासायनिक रंगांनी रंगवलेल्या भिंतींपेक्षा मातीने सारवलेल्या भिंती घराला “श्वास” देतात.

शेण:

  • नैसर्गिक जंतुनाशक आहे
  • घरातील तापमान संतुलित ठेवते
  • आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते

शेती, रोजगार आणि सर्क्युलर अर्थव्यवस्था

शेणाची गरज वाढली तर:

  • दुग्ध व्यवसायाला बळ मिळेल
  • शेतकऱ्यांसाठी शेण व्यवसाय उभा राहील
  • बायोगॅस निर्मिती शक्य होईल
  • नैसर्गिक खत उपलब्ध होईल
  • रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होईल

यामुळे शेतीचा खर्च कमी होऊन शेती परवडणारी होऊ शकते.

शहरातही:

  • घर सारवणे
  • भिंती सारवणे
  • छप्पर शाकारणे

या कामांसाठी नवा रोजगार निर्माण होऊ शकतो.

सगळ्यांसाठी आधुनिक बांधकाम नको

संडास, स्नानगृह, रुग्णालये, सरकारी कार्यालयांसाठी आधुनिक बांधकाम योग्य आहे.

पण सरसकट सर्व घरांसाठी सिमेंट-काँक्रीटचा आग्रह धरणे चुकीचे आहे.

दहा-वीस वर्षे टिकणारी, माती-लाकूड-बांबूची घरे पुरेशी आहेत.

त्यासाठी:

  • सागवान, बांबू, ऊस उत्पादन
  • किरळ, लिंब, बाभळी यांसारख्या वन्य झाडांचे संवर्धन

हे सगळं शक्य आहे.

डोंगर फोडणारा विकास की निसर्ग जपणारा विकास?

सिमेंटची घरे दीर्घकाळ टिकतात, पण नवीन घरांसाठी नवीन जागा लागते. त्यामुळे आज डोंगर फोडले जात आहेत, टेकड्या सपाट केल्या जात आहेत, नैसर्गिक रचना उद्ध्वस्त केली जात आहे.

नैसर्गिक घरे मात्र एकाच जागेवर पुन्हा पुन्हा उभी राहू शकतात.

निष्कर्ष : विकासाची दिशा बदलण्याची वेळ

निसर्ग नष्ट करून होणारा विकास हा आत्मघातकी आहे.

खरा विकास म्हणजे:

  • माणसाचं आरोग्य
  • शेतीचं संरक्षण
  • पाण्याची शुद्धता
  • रोजगाराची शाश्वतता
  • पुढच्या पिढ्यांसाठी जगण्यासारखा निसर्ग

आज आपण दिशा बदलली नाही, तर उद्या बदलायला जगच उरणार नाही.

कारण विकास हा माणसासाठी असावा,
माणूस विकासासाठी नाही.


लेखक: अरुण रामचंद्र पांगारकर
श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज

Comments

  1. स्वागत आणि अभिनंदन!

    ReplyDelete
  2. अभ्यास पूर्ण लेख

    ReplyDelete

Post a Comment

✊ आपले विचार खाली नोंदवा. श्रमिकांच्या हक्कासाठी एक विधायक विचारही परिवर्तन घडवू शकतो. सभ्य आणि विचारशील प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.
✊ अपने विचार नीचे दर्ज करें। श्रमिकों के अधिकारों के लिए आपका एक सकारात्मक विचार भी परिवर्तन ला सकता है। शालीन और रचनात्मक टिप्पणियों का स्वागत है।
✊ Share your thoughts below. Even a single constructive idea can bring change for workers’ rights. Respectful and meaningful comments are always welcome.

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

Poisoned Food, Rising Cancer and Chemical Farming: This Is Not Just a Mistake, It Is a Crime