पूरचाऱ्यांसाठी निधी नाही, पण भोंदू अशोक खरातच्या प्रकल्पासाठी दारणा नदीचे पाणी?

Image
📝 पूरचाऱ्यांसाठी निधी नाही, पण भोंदू अशोक खरातच्या प्रकल्पासाठी दारणा नदीचे पाणी? – हा कोणता विकास? आज राज्यातील वास्तव पाहिले, तर एक अत्यंत संतापजनक विरोधाभास आपल्या समोर उभा राहतो. एका बाजूला शेतकरी शेतीसाठी आवश्यक असलेल्या पूर चाऱ्यांसाठी निधीअभावी झगडत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना लोकवर्गणीतून पूर चाऱ्या तयार कराव्या लागत आहेत. 👉 म्हणजेच, शेतीसारख्या मूलभूत क्षेत्रासाठी सरकारकडे पैसा नाही! 🌾 शेतकऱ्यांची हतबलता – स्वतःच करावा लागतो विकास पूर चाऱ्या उपलब्ध नाहीत पाणी व्यवस्थेची साधने अपुरी शासनाकडून वेळेवर मदत नाही परिणामी, शेतकऱ्यांना स्वतःच पैसे जमा करून ही कामे करावी लागत आहेत. हा प्रकार म्हणजे शासनाच्या अपयशाची स्पष्ट कबुली आहे. 💧 अशोक खरातच्या प्रकल्पासाठी दारणा नदीचे पाणी दुसरीकडे, अशोक खरात सारख्या भोंदूच्या तथाकथित प्रकल्पासाठी सरकारने थेट दारणा नदी मधून पाण्याची सोय करून दिली आहे. 👉 शेतकऱ्यांसाठी पाणी नाही, पण अशा प्रकल्पांसाठी सहज उपलब्ध कसे? 👨‍👩‍👧‍👦 बेरोजगारी आणि सामाजिक संकट तरुणांना रोजगार नाही उत्पन्न नसल्यामुळे व...

विषारी अन्न, वाढता कॅन्सर आणि रासायनिक शेती : ही केवळ चूक नाही, तर अपराध आहे

Shramik Kranti – Garibon Ka Aawaz विषारी अन्न, वाढता कॅन्सर आणि रासायनिक शेती : ही केवळ चूक नाही, तर अपराध आहे

विषारी अन्न, वाढता कॅन्सर आणि रासायनिक शेती : ही केवळ चूक नाही, तर अपराध आहे

हल्ली कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. ही वाढ फक्त योगायोग नाही, ना केवळ जीवनशैलीचा परिणाम आहे. हा दीर्घकाळ शरीरात साठत गेलेल्या विषाचा परिणाम आहे, आणि त्या विषाचा सर्वात मोठा स्रोत आज अन्न बनले आहे.


अज्ञान नव्हे, जाणीवपूर्वक केलेला स्वार्थ

आज शेतीमध्ये युरिया, रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशके अज्ञानातून वापरली जात नाहीत.

प्रमाण किती असावे, फवारणीचा कालावधी काय असावा, काढणीपूर्वी किती दिवस थांबावे — हे सर्व माहिती असूनही पैशाच्या हव्यासापोटी अतिरेकी वापर केला जातो.

समाज, देश, देशबांधव, मानवता — अन्न पिकवताना या मूल्यांशी कोणालाही देणेघेणे उरलेले नाही, हे वास्तव स्वीकारावे लागेल.


चायना भाजीपाला : प्रणालीचे भयावह उदाहरण

हल्ली बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळणारा तथाकथित “चायना भाजीपाला” हा या संपूर्ण समस्येचे टोकाचे उदाहरण आहे.

अतिजलद वाढ, अस्वाभाविक आकार, नैसर्गिक टिकाऊपणाचा अभाव आणि भासमान चविष्टपणा — ही त्याची खरी वैशिष्ट्ये नसून अतिरासायनिक शेतीची लक्षणे आहेत.

हा भाजीपाला नेमका कुठे, कोणत्या प्रमाणात रसायने वापरून पिकवला जातो, यावर प्रभावी नियंत्रण नाही. तपासणी यंत्रणा अपुरी आहे, आणि ग्राहक केवळ किंमत व दिसण्यावर विश्वास ठेवतो.

मुद्दा “चायना भाजीपाला”चा नाही, मुद्दा अशा उत्पादनाला मोकळं सोडणाऱ्या व्यवस्थेचा आहे.

खाणाऱ्यांचाही निष्काळजी बेजबाबदारपणा

या परिस्थितीत खाणारा माणूसही पूर्णतः निर्दोष नाही.

  • दुष्परिणाम माहित असूनही दुर्लक्ष
  • फक्त चव, रंग आणि जिभेचे चोचले
  • “सगळेच खातात” ही मानसिकता

या सामूहिक बेफिकिरीची किंमत आज कॅन्सर, मधुमेह, हार्मोनल विकारांच्या रूपाने समाज मोजतो आहे.


ही व्यक्तींची नाही, प्रणालीची चूक आहे

होय, हा दोष प्रणालीचा आहे.

  • शेतकरी बाजाराच्या दबावाखाली आहे
  • बाजार नफ्याच्या हव्यासात आहे
  • ग्राहक सवयींचा गुलाम आहे

या साखळीला तोडू शकते ते फक्त शासन आणि कायदा.


आदर्श शेतकरी पुरस्कार : एक शोकांतिका

आज “आदर्श शेतकरी” पुरस्कार शेतकऱ्याने समाजाला किती आरोग्यदायी अन्न दिले यावर नाही, तर त्याने किती पैसा कमावला यावर दिला जातो. ही केवळ विसंगती नाही — ही आपल्या अन्नव्यवस्थेची शोकांतिका आहे.

आदर्शतेचे मोजमाप जर पैसा ठरत असेल, तर विषारी शेतीला सामाजिक मान्यता मिळतच राहणार.


रासायनिक शेती बंद करणे : गरज, पर्याय नव्हे

आता अर्धवट उपाय निरुपयोगी ठरले आहेत.

रासायनिक शेती पूर्णतः बंद करून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळणे हे कायद्याने बंधनकारक केले पाहिजे.

  • रासायनिक खते, कीटकनाशके व तणनाशके टप्प्याटप्प्याने बंद करावीत
  • सेंद्रिय शेतीला हमीभाव व सरकारी संरक्षण द्यावे
  • विषारी अन्न उत्पादनाला दंडात्मक गुन्हा ठरवावे
  • विषमुक्त अन्न हा मूलभूत मानवी हक्क मानावा

विषमुक्त अन्न = राष्ट्रीय सुरक्षा

जसे पाणी सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा याबद्दल बोलले जाते, तसेच विषमुक्त अन्न सुरक्षा हा राष्ट्रीय मुद्दा झाला पाहिजे.

कारण आज माणूस लगेच मरत नाही, पण हळूहळू आतून संपवला जात आहे.


हा प्रश्न शेतीचा नाही, तो आपल्या अस्तित्वाचा आहे.

लेखक अरुण रामचंद्र पांगारकर, प्रणेता — श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

Poisoned Food, Rising Cancer and Chemical Farming: This Is Not Just a Mistake, It Is a Crime